Thursday 30 July 2020

छत्रपती शिवराय ह्यांच्या काळातील चलन

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून आपली नाणीही चलनात आणली. त्याकाळी तो क्रांतिकारी निर्णय होता.

maharashtra times


शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी (६जून १६७४ इ.स.) ये दिवशी हा महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिष्ठित चक्रवर्ती नृपति झाला. येणेप्रमाणे राजे सिंहासनारुढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा ‘मऱ्हाटा पातशाहा’ येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. शिवरायांचा
निकटतम आदयं चरित्रकार कृष्णाजी अनंत ‘सभासद’ हिरेपारखी यांचे वरील वर्णन महाराजांच्या देदीप्यमान, अतुलनीय अशा राजाभिषेक सोहळयाची यथोचित माहिती देते. ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अदभूत व असामान्य होती तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक

दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
बिंदूमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत ‘श्री राजा शिव’ व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत ‘छत्रपति’ असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते. तसेच या मजकूराबरोबर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, पिंडी, त्रिशूळ अशी काही चिन्हे ही त्या नाण्यांवर छापलेली असायची. शिवराईच्या अशा जवळपास दीडशेच्या वर वैविध्यपूर्ण आवृत्त्या

मिळतात. राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित

होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या


पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after
his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby. (Ref. English Records on Shivaji (१६५९-१६८२), Letter no. ४८०, Page - ३६३)’
औरंगजेबाच्या चरित्रकार खाफीखान तसेच ग्रँट डफ म्हणतात, शिवाजीने १६६४ मध्ये म्हणजे शहाजी राजांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर ‘राजा’ हा किताब धारण केला व स्वत:ची नाणी पाडण्यास सुरुवात केली, मात्र हे ग्राह्य धरल्यास नाण्याच्या मागील बाजूस (ध्दङ्ढध्ङ्ढध्दद्मङ्ढ) ‘छत्रपति’ हे शब्दं कसे येतील? कारण अभिषिक्तं राजाच

हे शब्दं वापरु शकेल आणि शिवरायांचा राजाभिषेक १६७४ मध्ये झाला. त्या समयी त्यांनी ‘छत्रपति’ हा किताब धारण केला. म्हणून खाफीखानाचे म्हणणे ग्राह्य धरण्यास अडचण येते.
मात्र शिवराई तसेच होन यांवर मूल्यदर्शक उल्लेख (फेस व्हॅल्यू)े वर्ष (मिंटिंग ईयर), कोठे पाडले याचा उल्लेख (ंमिंट-टांकसाळीचे ठिकाण) इ. बाबी छापलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ धातूवरुन त्याचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. गेल्या शतकात देखील शिवराई हे नाणे पुणे व इतर भागात वापरत होते असा स्पष्ट उल्लेख दत्तो वामन

पोतदार यांनी केला आहे. गेली दोन-तीन वर्षे शिवराई मुंबईतही बऱ्यापेैकी उपलब्ध होती (संग्राहकांसाठी) पण आता ती क्वचितच मिळते. महाराजांचे सोन्याचे होन हे मात्रं खूपच दुर्मिळ नाणे आहे. आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होन शिल्लक आहेत. तरीही काही संशोधक तसेच अभ्यासक महाराज राज्याभिषेकाआधी नाणी पाडत असावेत असे

अजून समजतात. मात्र हेन्री ऑक्झिंडेनचे वरील पत्रं साऱ्या गोष्टी स्पष्ट करणारे आहे.
शिवाजी महाराजांना आपल्या हिंदू धर्माचा रास्त आभिमान होता. त्यांनी आपल्या नाण्यांवरील लिपी ही देवनागरी ठेवली तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्राम वजनाचे होन पाडले. मराठी भाषेत शिरलेल्या ‘फारसी’ (पर्शियन) शब्दांना संस्कृत प्रतिशब्दं, देवनागरी

भाषेतील नाणी व चक्रवर्ती राजाप्रमाणे राजाभिषेकाद्वारे धारण केलेले छत्रपतिपद यांवरून महाराजांना स्वधर्म, स्वभाषा व स्वराज्य या गोष्टींचा निस्सीम अभिमान होता हे दिसून येते. महाराजांनी तांब्याच्या व सोन्याच्या नाण्याप्रमाणे चांदीची नाणी का पाडली नाहीत याचा उलगडा होत नाही. नाही म्हणायला ‘श्री जगदंबा प्रसन्न’ असे लिहिलेले एक नाणे उपलब्ध

झाले आहे. मात्र ते शिवाजी महाराजांनी पाडले असे ग्राह्य धरण्यास कोणताही आधार नाही. जर तांबे व सोन्याच्या नाण्यांवर श्री राजा शिव छत्रपति ही अक्षरे / मजकूर असेल तर तोच न्याय चांदीच्या नाण्यास का नसावा? मात्रं गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडे चांदीची शिवराई असल्याचा उल्लेख श्री. पद्माकर प्रभुणे यांनी एके ठिकाणी केला आहे. इतिहासातील

उल्लेखांस पुरावा जरी अत्यावश्यक असलाच तरी केवळ पुरावा नसल्याने एखाद्या गोष्टीची शक्यता नाकारणे हे ही तितकेसे योग्य नव्हे. कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे अनेक इतिहास अभ्यसकांचा आक्षेप आहे की छत्रपति शिवरायांना लिहिता येत नव्हते कारण त्यांचे हस्ताक्षर सापडत नाही याच न्यायाने ते म्हणतात की, तसे तर औरंगजेबाचे

कपडे ही आज उपलब्ध नाहीत मग काय म्हणायचे? असो. हे जरा विषयांतर झाले. मात्र छत्रपतिंचे नाव घेताच डोळया समोर येणारी नाणी म्हणजे होन आणि शिवराई. हिलाच रुका, तांबडा छत्रपति अशी ही अन्य संबोधने आहेत.
तांब्याच्या या शिवराई पैश्याचे वजन साधारणत: १२ ते १४ ग्राम इतके असते, व तिचा व्यास २.५ सेंमी इतका असतो. शिवराई पैसा तसेच सोन्याचा होन हे हाती पाडले जायचे. एका बाजूची डाय (आवृत्ती) खाली, मध्ये तांब्याची पट्टी व त्यावर दुसऱ्या बाजूच्या पंचिंग रॉड किंवा हातोडयाने (ज्यावर उलटी / अक्षरे असायची) घाव

घातला जायचा. त्यामुळे नाण्यावरील लिपी / लिखाण हे बरेचदा आजूबाजूला सरकलेले दिसते. या पध्दतीने पाडलेल्या नाण्यास क्रूड कॉईन्स असे म्हणतात. त्यामुळे ही नाणी साधारणत: ओबड धोबड स्वरुपात दिसतात. सह्याद्रीच्या मुलुखाप्रमाणे. सोन्याचे होन पाडण्याची पध्दतही हीच होती. मात्र त्याची डाय वेगळी असायची. कारण होनाचा व्यास १.३

सेमी इतका असायचा. बाकी मजकूर, नाण्याच्या कडेभोवती (कॉलर) बिंदूयुक्त वर्तुळ ह्या अन्य बाबी समान होत्या.
स्वभाषेत पाडलेल्या या क्रांतीकारी नाण्यांची परंपरा महाराजांनंतर छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम महाराज, तसेच छत्रपति शाहू (थोरले) महाराज यांच्या कालावधीत सुरु होती. मात्रं शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानात पसरवण्यास सुरुवात केली. थेट अटकेपर्यंत मराठा सैन्याने राघोबादादांच्या

नेतृत्वाखाली धडक मारली. त्यामुळे पेशवे व त्यांचे आधारस्तंभ असणाऱ्या शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि संस्थानिक सरदारांना स्थानिक भाषेचा (पर्शियिन) आधार घ्यावा लागला. कारण इंदौर, धार, देवास, ग्वाल्हेर, बडोदा, कटक (रघुजी भोसले - नागपूरकर) असे सर्वत्र मराठा साम्राज्य विस्तारले होते. दिल्लीला कोण बादशाहा

बसणार हे सुध्दा मराठेच ठरवित. आज ऐकायला नवल वाटेल की, सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर तसेच मुलतान या शहरांवर काही काळ मराठयांचा ताबा होता व त्यांच्या तेथे टांकसाळी (मिंटस्-नाणी पाडण्याची जागा) सुध्दा होत्या. असो छत्रपति शिवरायांनी निश्चितच हिंदुधर्माला व जनतेला स्वत:च्या तेजाने पुन्हा जागृत केले. त्यांना स्वधर्म,

स्वभाषा व स्वराज्य यासाठी लढा देण्यास शिकवले. त्यासाठी स्वभाषेतील नाणी पाडली, संस्कृत प्रतिशब्दांचा कोष (डिक्शनरी) तयार केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘स्वत्वाची’ जाणीव करुन दिली म्हणून त्यांचे यथार्थ वर्णन करताना कवी भूषण म्हणतात
देवल गिरावते फिरावते निशाने अली
ऐसे डूबे राव-राने सबी ठाये लबकी
गौरा-गनपति आप, औरन को देत ताप
अपनी ही बार सब मारी गये दबकी
पीरा-पैगंबरा दिंगबरा दिखाई देत.
सिध्दकी सिध्दाई गयी रही बात रब की
कासी हूँ की कला जाती, मथुरा मसीद होती
सिवाजीन होतो तो सुनाति होत सब की !
अर्थ - सगळया सरदार संस्थानिकांसमोरच (अर्थात हिंदू) देवळेपाहून तेथे अलीची निशाणे लावली जात आहेत. विघ्नकर्ते, विघ्नहर्ते गौरी तसेच गणपति या संरक्षक देवता स्वत:वर पाळी येताच लपून बसल्या आहेत. जिकडे तिकडे पीर, फकीर यांचेच प्राबल्य वाढले असून साधक (साधू-पुरुष) नामशेष होऊन केवळ अल्लाचा (रब) घोष सर्वत्र उठतआहे.
काशीची कला/कळा नाहीशी झाली असती, मथुरेची ही मशीद झाली असती, जर छत्रपति शिवाजी महाराज जन्मले नसते तर अवघ्यांची सुंता झाली असती.
   शिवाजी महाराजांनी सुरू केलेले चलन एका ठिकाणी असावे आणि सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने पोहोचावे, या हेतूने ही सर्व माहिती ‘स्वराज्याचे चलन’मध्ये संकलित करून आशुतोष राहाणे-पाटील यांनी ती ६ जून, २०१८ रोजी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण केली. याच स्वराज्याच्या चलनाची सफर आज आपण संक्षिप्त रुपात बघूया. नुकताच शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने स्वराज्याच्या चलनाचा संक्षिप्त आढावा घेऊया.
आपल्या महाराष्ट्रात अनेक लोकांना ‘नाणेसंग्रह’ करण्याचा छंद आहे. ते विविध काळातील, विविध धातूंची नाणी जमवतात. मी दहावीत असताना हा छंद मलाही लागला. नाण्यांमध्ये असलेल्या विविधतेबद्दलच्या उत्सुकतेने माझ्यातील संग्राहकाला जागे करत हा नाणी जमवण्याचा छंद मला लावला. फक्त एक संग्राहक म्हणून सुरुवातीला मी नाणी जमवत होतो. मग त्यात काल-स्थल मर्यादा नव्हती. वाट भरकटलेल्या प्रवाशासारखा या नाण्यांच्या माध्यमातून सर्वच काळ फिरू लागलो. काही काळानंतर हे ‘नाण्यांचे जग’ अफाट आहे, हे लक्षात येताच, आपण सर्व काळ फिरत चुकतोय आणि आपल्याला सर्व काळातील नाणी जमा करणं शक्य नाही हे लक्षात आलं. तिथेच मी चूक सुधारून ठराविक विषय निवडत पुढच्या प्रवासाला लागलो. संग्राहकाचा प्रवास हा फक्त छंदापुरता मर्यादित राहून शेवटपर्यंत फक्त संग्राहक म्हणूनच राहावे, हे मला पटत नव्हते. मग मी या नाण्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. अभ्यास करताना मराठी भाषेत या विषयाबद्दलच्या पुस्तकांच्या असलेल्या कमतरतेने माझ्यातील लेखकाला जागवत ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ हे पुस्तक हातून घडले. पुढे एक गोष्ट प्रकर्षाने खटकत होती आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या स्वराज्याच्या चलनावर नसलेले सखोल पुस्तक! मग मीच हे शिवधनुष्य पेलत शिवाजी महाराजांनी सुरू केलेले चलन एका ठिकाणी असावे आणि सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने पोहोचावे, या हेतूने ही सर्व माहिती ‘स्वराज्याचे चलन’मध्ये संकलित करून ती ६ जून, २०१८ रोजी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण केली. याच स्वराज्याच्या चलनाची सफर आज आपण संक्षिप्त रुपात बघूया. नुकताच शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने स्वराज्याच्या चलनाचा संक्षिप्त आढावा घेऊया.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा ही काही वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांआधी घडवलेला इतिहास आजही आम्हाला प्रेरणादायी आहे. जनतेचे राज्य ‘स्वराज्य’ स्थापण्याचे मनात असलेले स्वप्न सत्य करण्याच्या मार्गाने महाराजांची सुरू झालेली घोडदौड थांबवणे शक्य नाही, हे विरोधी शक्ती ओळखून होत्या. ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणणाऱ्या संतांची आर्त हाक देवांनी ऐकली होती. स्वराज्य निर्मितीचे कार्य हळूहळू भव्य होऊ लागले होते आणि दि. ६ जून, १६७४ रोजी हे स्वप्न सत्यात उतरले. शेकडो वर्षांचे या भूमीला लागलेले ग्रहण सुटले. स्वराज्याला अभिषिक्त राजा मिळाला. या पृथ्वीवर एक मराठा राजा ‘छत्रपती’ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी मोठ्या थाटात पार पडला. ‘ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा एवढा मऱ्हाटा पातशाहा छत्रपति जाहला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही,’ असे कृष्णाजी अनंत सभासद स्वाभिमानांनी त्यांच्या बखरीत लिहिले आहे. या राज्याभिषेकापासून महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणे सुरू केलेले ‘स्वचलन’ ही काही साधारण घटना नव्हती. त्यांनी मुघल वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची नाणी ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
राज्याभिषेकसमयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिडेन रायगडवर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती, त्यातील १९ वे महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र, महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली. यावरून महाराजांची दूरदृष्टी पुन्हा आपल्या नजरेस पडते आणि महाराज स्वतःचीच टांकसाळी काढून स्वतःचेच नाणे चालवणार असल्याने आपल्याला परवानगी मिळणार नाही, असे हेन्री ऑक्झिंडेन पत्रात सांगतो. आता स्वराज्याला आपले प्रतिनिधित्व करणारे तांब्याची ‘शिवराई’ आणि सोन्याचा ’शिवराई होन’ हे चलन लाभले होते. ‘शिवराई’ नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले आणि १६७४ पासून तब्बल १९व्या शतकापर्यंत ‘शिवराई’ नाणे चलनात राहिले. अर्थात, महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी अशीच नाणी चलनात आणली. खरंतर १९व्या शतकात ‘शिवराई’ बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ला आपल्या राज्याभिषेकापासून टांकसाळीत पाडलेले ‘शिवराई’ नाणे तांब्याचे होते. या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदूमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/ शिव’ असे तीन ओळीत तर मागील बाजूस ’छत्र/पती’ असा दोन ओळीत मजकूर होता. या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर होता. ही नाणी ११-१३ ग्रॅम वजनात आढळतात. या ‘शिवराई’ची त्याकाळात किंमत १ पैसा होती आणि अशा ६४ ‘शिवराई’ मिळून १ रुपया होत असे. १६७४ ला पाडलेल्या ‘शिवराई’ आपण सुरुवातीच्या ‘शिवराई’ म्हणून ओळखतो. या ‘शिवराई’ सुरुवातीच्या असल्याचे त्यांच्या जास्त वजनावरून तसेच त्या नाण्यांवर असलेल्या सुबक अक्षरांवरून आपण मानतो.
 
साधारणतः पूर्ण एक ‘शिवराई’ १२-१३ ग्रॅम वजनाची मानल्यास अर्धी ‘शिवराई’ ही सहा-सात ग्रॅम्सची असेल आणि पाव ‘शिवराई’ तीन-चार ग्रॅम्सची असेल. या विविध परिमाणांच्या ‘शिवराईं’चे अक्षरवळण साधारणतः सारखेच असून यावरील उल्लेख हा पुढील बाजूंनी तीन ओळीत ‘श्री/राजा/शिव’ आणि मागील बाजूंनी ‘छत्र/पति’ असा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास ’शिवराई होन’ म्हणतात. शिवाजी महाराजांच्या ’शिवराई होन’ या नाण्यावर बिंदूमय वर्तुळात पुढील बाजूंनी तीन ओळीत ‘श्री/राजा/शिव’ तर मागील बाजूंनी दोन ओळीत ‘छत्र/पति’ असे अंकीत केलेले होते. या नाण्याचा आकार वाटोळा असून नाण्याचे वजन २ मासे ७ गुंजा म्हणजेच २.७ ग्रॅमच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास १.३२ सेमी असून त्यात सोन्याचा कस हा ९७.४५ आहे. राजधानी रायगडवरील टांकसाळीत फक्त ‘शिवराई होन’ पाडण्यात येत होती. ‘रुका,’ ‘तिरुका,’ ‘सापिका’ आणि ‘ससगणी’ ही नाणी इतरत्र पाडण्यात येत असल्याचे अप्पा परब त्यांच्या ‘किल्ले रायगड स्थळदर्शन’ या ग्रंथात पृष्ठ क्र. १६४ वर लिहितात. हा ‘शिवराई होन’ आज फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ‘स्वराज्याचे चलन’ या पुस्तकात १८ ‘शिवराई होन’ छायाचित्रांसहित सादर केलेले आहेत म्हणजे आज ‘शिवराई होन’ १८ हून अधिक उपलब्ध आहेत, असे म्हणता येईल.
धनानी दिलेल्या साथीमुळे आणि स्वराज्यरक्षकांच्या मेहनतीमुळे प्रतिपदेची चंद्रकोर आता फक्त कोर राहिली नव्हती. त्याचा लवकरच पूर्ण चंद्र होणार होता. महाराजांचे राज्य आता दक्षिणेपर्यंत पोहोचलेले होते. तिकडेही महाराजांच्या नावाने नाणी पाडली जात होती आणि त्या नाण्यांद्वारे प्रत्येक सामान्यापर्यंत महाराज पोहोचत होते! छत्रपती शिवाजी महाराज एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व! किती ते त्यांचे पैलू, किती तो त्यांचा दूर दृष्टिकोन आणि किती तो त्यांचा स्वाभिमान! महाराज काय होते हे समजून घेणे अत्यंत कठीण आहे. प्रत्येक जण महाराजांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करीत असतो. मला महाराज समजले ते चलनातून ! एका अशा गोष्टीतून जे मराठ्यांच्या इतिहासातील एक फार कमी हाताळलेले दुर्मीळ सोनेरी पान आहे.